वेब टीम : मुंबई स्त्रिया ह्या दिवसभर आपल्या घरात काम करत असतात आपल्या कुटुंबाला तसेच आपल्या मुलांनाही सांभाळत असतात. त्यामुळे दिवसभराच्...
वेब टीम : मुंबई
स्त्रिया ह्या दिवसभर आपल्या घरात काम करत असतात आपल्या कुटुंबाला तसेच आपल्या मुलांनाही सांभाळत असतात. त्यामुळे दिवसभराच्या चिंता करण्यातच त्यांचा सगळा दिवस वेळ आणि आयुष्य ही निघून जाते.
पण तुम्ही ही सर्व कामे करत असताना स्वतच्या शरीराकडे थोड तरी लक्ष दिले नाही तर तुमचा कुटुंब ही अस्वस्थ होणार आणि त्यामुळे तुम्हालाही तुमच्या शरीर स्वस्थ्याकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे.
तीस वय झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यात काही बदल करणे गरजेचे आहे शिवाय फिटनेस वर ही थोड लक्ष केंद्रित करायला हवंय. वाढत जाणाऱ्या वयासोबत तुमचं अंग, हाडे आणि त्वचा यांना सगळ्यांना एक्स्ट्रा पोषणाची गरज असते. त्यामुळे हे जर तुमच्या शरीरात नसेल तर तुम्हाला नक्की शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
तुम्ही जर तुमचे शरीर अॅक्टीव नाही ठेवले तर तुम्हाला मधुमेह सारखा आजार होऊ शकतो ही समस्या महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे गरजेचे आहे.
यासाठी आताच लक्ष द्या नाहीतर भविष्यात फैलोपियन ट्यूब मधील रोग तसेच यूरिनरी ट्रैक्ट इंफेक्शन (यूटीआई) सारख्या आजाराला सामोरे जावे लागेल. तसेच मधुमेह हा वयाच्या तिशी नंतर एक गंभीर रूप धारण करते.
फाइब्रॉइड या आजारामुळे ही अधिक महिला त्रासल्या आहेत 30 ते 50 वयाच्या महिलांमध्ये फाइब्रॉइड होण्याचा धोका अधिक असतो. पण हा रोग झाल्याचे लगेचच कळत नाही शिवाय कित्तेक वेळा यावर उपचार करूनही हा आजार अधिक बळावत जातो.
त्यामुळे तुम्हाला फाइब्रॉइड आहे की नाही हे अल्ट्रासाउंड किंवा अन्य मार्गाने समजते. जर तुमच्या पोटाच्या खालच्या बाजूला दुखत असेल तर लवकर डॉक्टरांना दाखवा
जर तुम्ही उशिरा आई होत असाल तरीही ठीक आहे कारण वयाच्या तिशी नंतर प्रजनन क्षमता खूप कमी होते. शिवाय 35 वर्षानंतर तर अधिकच कमी होते.
त्यामुळें गरोदर होणे ही खूप कठीण जाते. 35 वर्ष झाल्यानंतर इन्फर्टिलिटी, गर्भपात किंवा गर्भाला शारीरिक समस्या निर्माण होण्याचा धोका अधिक असतो.
COMMENTS