file photo वेब टीम : नागपूर बेळगाव आणि कारवारमधील मराठी लोकांवर भाषिक अत्याचार सुरु आहेत असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, त्यांचा आक्रो...
file photo |
वेब टीम : नागपूर
बेळगाव आणि कारवारमधील मराठी लोकांवर भाषिक अत्याचार सुरु आहेत असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, त्यांचा आक्रोश भाजपला ऐकू येत नाही का? आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी बेळगाव आणि कारवारचा उल्लेख कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असा केला.
सीमाभागातील हे लोक हिंदू नाहीत का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. केंद्र सरकारची भूमिका पालकाची असायला हवी.
सीमावादाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नेहमी कर्नाटकची बाजूच उचलून धरली. कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य आहे, केंद्रातही आहे, मग बेळगाव, कारवारचा प्रश्न का सोडवला जात नाही, असा सवालही उद्धव यांनी विचारला.
सावरकरांबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेला कोंडीत धरू पाहणा-याभाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्त्युत्तरात म्हटले आहे की सावरकर हा तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
मात्र आधी आपल्यालाच सावरकर कळला आहे का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले, सावरकरांचे समग्र हिंदुत्व, त्यांचे गायीबद्दलचे विचार भाजपला तरी मान्य आहेत का.
गोवंश हत्याबंदीचा कायदा देशातील सर्व राज्यांमध्ये का लागू करण्यात आला नाही? गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर आणि खासदार किरेन रिजीजू यांचे गोमांस खाण्याबाबतचे मत मांडत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
केंद्र सरकार बाहेरच्या देशातील हिंदूंना आसरा द्याययी भाषा करते. मात्र, आपल्याला देशातील काश्मिरी पंडितांनाच न्याय देता येत नसेल तर बाहेरच्या देशातील हिंदू घेऊन काय करणार, असा सवाल उपस्थित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपण सावरकरांना मानत असू तर मग देशातील आक्रोश करणाऱ्या हिंदूंचे काय? ‘बेळगाव-कारवारमधील लोक हिंदू नाहीत का?’
COMMENTS