वेब टीम : मुंबई राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीच्या सरकारच्या मंत्र्यांचे बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित खातेवाटप अखेर आज ...
वेब टीम : मुंबई
राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीच्या सरकारच्या मंत्र्यांचे बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित खातेवाटप अखेर आज जाहीर आले. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रीपद तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांकडे महसूल मंत्रीपद आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.मात्र खातेवाटप झाले नव्हते. आज हे खातेवाटप जाहीर झाले.
जयंत पाटील : वित्त आणि नियोजन, गृह निर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्यांक विकास.
सुभाष देसाई : उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन,परिवहन खाते
बाळासाहेब थोरात : महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय.
नितीन राऊत : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आदिवासी विकास, महिला व बाल विकास,वस्त्रोद्योग, मदत व पुर्नवसन, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण
एकनाथ शिंदे : गृह आणि नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा संधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.
छगन भुजबळ : ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न आणि औषध प्रशासन.
COMMENTS