वेब टीम : दिल्ली रोजगाराच्या प्रश्नांमुळे मोदी सरकार तुमच्या रागाचा सामना करू शकत नाही. यामुळे मोदी आणि शहा यांनी तुमचे भविष्य उद्ध्वस्...
वेब टीम : दिल्ली
रोजगाराच्या प्रश्नांमुळे मोदी सरकार तुमच्या रागाचा सामना करू शकत नाही. यामुळे मोदी आणि शहा यांनी तुमचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे, अशी घणाघाती टीका देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे.
डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, सुधारित नागरिकत्व कायदा आणि तरुणांच्या आंदोलनावर राहुल यांनी रविवारी ट्विट करून भाष्य केले. ते म्हणाले, मोदी आणि शहा यांनी तुमचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे.
अर्थव्यवस्थेला पोहोचवलेली हानी आणि घटलेल्या रोजगारामुळे मोदी सरकार तरुणांच्या रागाला सामोरे जाऊ शकत नाही. त्यामुळे ते भारतामध्ये फूट पाडून द्वेष लपवत आहेत. आपण प्रत्येक भारतीयाविषयी प्रेम व्यक्त करून त्यांचा पराभव करू शकतो.
राहुल यांच्याबरोबरच माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका केली होती. व्यावसायिक कर कमी करण्यासह जे उपाय सरकारने केले आहेत, ते त्यांच्या जवळ असलेल्या उद्योजकांना मदत करणारे आहेत.
खरेतर ज्यांचे उत्पन्नाचे स्रोत गेले. नोकर्या गेल्या. कमी उत्पन्न असणार्यांना मदत करण्याची ही वेळ आहे. पण सरकारने केवळ ८०० कंपन्यांना मदत केली, असा आरोप चिदंबरम यांनी केला.
COMMENTS