वेब टीम : मुंबई राज्यातील विशेषत: नागपूरमधील वाढत्या गुन्ह्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारी मोडून का...
वेब टीम : मुंबई
राज्यातील विशेषत: नागपूरमधील वाढत्या गुन्ह्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांना दिले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून नागपूरमधील गुन्हेगारी ही राजकीय नेतृत्वासाठी टीकेचे कारण झाली आहे. या गुन्हेगारीचा नागरिकांना होणारा हा त्रास यापुढे कायम राहू नये यासाठी राजकीय लागेबांधे न बघता गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
COMMENTS