वेब टीम : अहमदनगर राजकारणाबरोबर समाजकारणावर भर द्या. समाजामध्ये विविध प्रश्न प्रलंबित आहे. राजकारणाचा उपयोग हे प्रश्न सोडविण्यासाठी क...
वेब टीम : अहमदनगर
राजकारणाबरोबर समाजकारणावर भर द्या. समाजामध्ये विविध प्रश्न प्रलंबित आहे. राजकारणाचा उपयोग हे प्रश्न सोडविण्यासाठी करा. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासासाठी मोठा निधी दिला जाईल.
आ. संग्राम जगताप यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून ठसा उमटविला आहे. शहरामध्ये ज्येष्ठांबरोबरच युवकांचे संघटन केल्यामुळेच नगरकरांचा विश्वास आ. संग्राम जगताप यांच्यावर आहे.
अनेक युवकांना संघटित करुन समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावतात. त्यांच्या माध्यमातून शहरातील प्रलंबित प्रश्न आम्ही सोडविणार. मुंबई येथे सुमित कुलकर्णी यांच्या पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
चाणक्य मंडळ प्रतिष्ठानचे सचिव सुमित कुलकर्णी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्ष प्रवेश झाला. यावेळी आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके, आ. आशुतोष काळे, नगरसेवक गणेश भोसले आदी उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, सर्वांना बरोबर घेऊन शहरामध्ये काम करत आहे. विकास कामांतून नागरिकांचा विश्वास संपादन केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांनी प्रवेश केला.
सुमित कुलकर्णी यांनी सावेडी उपनगरात आपल्या कामाच्या माध्यमातून युवकांमध्ये व समाजामध्ये ठसा उमटविला आहे. युवकांनी संघटन करुन समाजातील विविध प्रश्न सोडविण्याची कामे करावीत. राजकारणाचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करावा. सुमित कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी काम करावे, असे ते म्हणाले.
यावेळी पक्ष प्रवेशावेळी बोलताना श्री. कुलकर्णी म्हणाले की, शिवसेनेच्या युवा सेनेच्या जिल्हा विधानसभा समन्वयक म्हणून काम केले आहे. आ. संग्राम जगताप यांच्या विचारामुळे मी त्यांच्या जवळ गेलो.
विधानसभा निवडणुकीनंतर या पदाचा रितसर राजीनामा दिला आहे. आता आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये काम करणार आहे. सावेडी उपनगरात व शहरात समाजोपयोगी कामे, युवकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, मेळावे आयोजित केले जाणार आहे, असे ते म्हणाले.
COMMENTS