वेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरी भागात ३१ मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत अ...
वेब टीम : मुंबई
कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरी भागात ३१ मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
त्यानुसार एकाचवेळी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. नागरिकांनी घाबरून जाऊन जीवनावश्यक वस्तूंचा साठा करू नये, असे आवाहन ठाकरे यांनी केली.
राज्यातील बससेवा ही फक्त जीवनावश्यक वस्तूंसाठी वापरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
कोरोना व्हायरसचा आज महाराष्ट्रात दुसरा बळी गेला आहे. मुबंईत 63 वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधित या रुग्णाला 21 मार्चला रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
या रुग्णाच्या मृत्यूनंतर देशभरातील मृतांचा आकडा आता 5 वर पोहोचला आहे.
याधी 17 मार्चला मुंबईत कस्तुरबा रूग्णालयात 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुबईवरून प्रवास करून ते भारतात आले होते.
महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 10 रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात आज 10 रुग्ण आढळले यामध्ये मुंबईतील सहा तर पुण्यातील चार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
कालपासून कालपासून मुंबईत 12 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.
परदेशातून येणाऱ्यांनी वेगळे राहावे. राज्यात धान्य, दूध, भाजीपाल्याची वाहतूक सुरु राहणार आहे.
गरज पडल्यास ३१ मार्च नंतरही कलम १४४ लागू ठेवण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
COMMENTS