वेब टीम : दिल्ली देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन य...
वेब टीम : दिल्ली
देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे.
मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा केली आहे.
देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असे ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.
आशा वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देणार असल्याचे ही सीतारामन यांनी जाहीर केले.
देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ १ किलो डाळ मोफत मिळणार. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे.
अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.
एकही गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेणार असल्याचे ही त्यांनी जाहीर केले.
देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.
देशाचा पोशिंदा अर्थात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद करणार आहे.
८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर दोन हजार रुपये जमा करणार आहेत.
एप्रिल महिन्यात हे पैसे खात्यांवर जमा केले जातील असे ही अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.
किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत हे पैसे जमा केले जातील असे ही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी, मनरेगा कर्मचारी, विधवा, दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. असंही आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
COMMENTS