वेब टीम : दिल्ली कोरोनाच्या प्रादुर्भाव झाल्याने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसह देशातंर्गत विमान वाहतूक सेवा बंद केली होती...
वेब टीम : दिल्ली
कोरोनाच्या प्रादुर्भाव झाल्याने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसह देशातंर्गत विमान वाहतूक सेवा बंद केली होती.
मागील दीड महिन्यांपासून जास्त काळ विमान सेवा बंद आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने लॉकडाउनला ३१ मे पर्यंत मुदतवाढ देताना अनेक बाबींमध्ये शिथिलता आणण्याचे संकेत दिले होते.
त्यामुळे हवाई वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
अखेर केंद्राने विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी याविषयीची माहिती दिली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशाच्या सीमा बंद करण्याबरोबच राज्यांच्या सीमाही बंद केल्या होत्या.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीबरोबर देशातंर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता.
अखेर लॉकडाउनचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर चौथ्या टप्प्याच्या अखेरीस विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे.
२५ मे पासून अंशकालीन पद्धतीने देशातंर्गत हवाई वाहतूक सुरू करण्यात येईल.
२५ मे पासून विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज राहावे, अशी माहिती सर्व विमानतळाच्या प्रशासनाला आणि हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आली आहे.
प्रवाशांच्या प्रवासांसंदर्भात नियमावली केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून जारी करण्यात येईल, असे हरदीप सिंह पुरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
COMMENTS