वेब टीम : दिल्ली भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५० टक्के झाला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सांगितले. देशातील राज...
वेब टीम : दिल्ली
भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५० टक्के झाला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सांगितले.
देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. याचवे ळी त्यांनी हे सांगितले.
राज्यांमधील कोरोनाची स्थिती मला जाणून घ्यायची आहे. तसेच राज्यांमधली परिस्थिती काय आहे?
त्याबाबत मला तुम्हा सगळ्यांचे सल्ले हवेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
तसंच त्यामुळेच पुढची रणनीती ठरवण्यात येईल असे ही मोदी यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे जे काही मृत्यू झालेत ती दुःखद बाब आहे असे ही त्यांनी म्हटले.
आपण करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जेवढे यशस्वी होऊ तेवढीच आपली अर्थव्यवस्थाही सुधारेल.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाल्यास सरकारी कार्यालयं, खासगी कार्यालं, मार्केट उघडू शकतील.
दळणवळणाची साधने सुरु होतील आणि तेवढ्याच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील असे ही मोदींनी म्हटले.
भारताने कोरोना काळात दाखवलेल्या संयमाची, शिस्तीची जगभरात चर्चा होते आहे.
लॉकडाऊन जाहीर करण्यात केल्यानंतर जगभरातले लोक भारतातल्या शिस्तीची चर्चा करत आहेत.
आपण जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा मास्क लावणं, सॅनेटायझर लावणं, बाहेरून घरात आल्यानंतर हात-पाय धुणे, हँडवॉशचा वापर करणे या सगळ्या गोष्टी पाळण्याचाही सल्ला त्यांनी दिला.
एवढंच नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव जेवढा कमी करण्यात आपण यशस्वी होऊ तशी आपल्या अर्थव्यवस्थेची वाट सुकर होईल असे ही मोदींनी म्हटले.
COMMENTS