वेब टीम : दिल्ली गलवान खोऱ्यात भारताला युद्ध नाही, बुद्ध पाहिजे. पण चीनला युद्ध हवे असेल तर भारत तयार आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया रिपाइ...
वेब टीम : दिल्ली
गलवान खोऱ्यात भारताला युद्ध नाही, बुद्ध पाहिजे. पण चीनला युद्ध हवे असेल तर भारत तयार आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
‘चायनीज फूड’वर बहिष्कार घाला, असे आवाहन आठवले यांनी केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की – चीन हा एक कपट करणारा देश आहे.
भारताने सर्व चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे. चिनी खाद्यपदार्थ व चिनी पदार्थांची हॉटेल्स भारतात बंद केली पाहिजेत!
भारताने चीनला बुद्ध दिला आहे, युद्ध दिलेले नाही. पण चीनला युद्धाची खुमखुमी असेल, तर भारतीय सैन्य चीनला कायमचा धडा शिकवेल.
भारतात कोरोनाशी युद्ध सुरू आहे. त्यामुळे आता आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा आहे.
‘कोरोना’शी सुरू असलेले युद्ध आम्ही जिंकणार आहोत आणि वेळ आल्यास चीनशीही युद्ध जिंकू, असे आठवले म्हणाले.
गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात शहीद जवानांना रामदास आठवले यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
ते म्हणालेत – “लडाखच्या गलवानमध्ये भारतीय सीमेवर चीनसोबत झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झालेत.
वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना विनम्र श्रद्धांजली! जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही.
भारत सरकार आणि सर्व भारतीय शहीद जवानांच्या कुटुंबीयांसमवेत उभे आहेत!
COMMENTS