वेब टीम : औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्लीत घडलेल्या ‘निझामुद्दीन मरकझ’ प्रकरणातील, तबलिकी जमातच्या देश आणि ...
वेब टीम : औरंगाबाद
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्लीत घडलेल्या ‘निझामुद्दीन मरकझ’ प्रकरणातील, तबलिकी जमातच्या देश आणि परदेशातील तबलिकी लोकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याचा निर्णय आज घेतला.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात तबलिकी जमातीला ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवला आहे.
सोबतच चुकीची माहिती तसेच चुकीची वार्तांकन करणाऱ्या मीडियाला न्यायालयाने चांगलेच फटकारले.
यावेळी, ‘दिल्लीच्या मरकझमध्ये आलेल्या परदेशी लोकांविरुद्ध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठा प्रोपोगंडा चालवण्यात आला.
भारतात फैलावणाऱ्या कोविड १९ संक्रमणाचा जबाबदार हे परदेशी लोक आहेत, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. ‘ असं न्यायालयानं म्हटलं.
याशिवाय महामारीच्या काळात राजकीय शक्ती नेहमीच कोणाला तरी बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करते.
तबलिघी जमातीला सुद्धा असंच बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे दिसत असल्याचे कोर्टाने यावेळी म्हटलं.
COMMENTS