वेब टीम : भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली होती. त्यानंतर एनडीआरएफ जवानांकडून...
वेब टीम : भिवंडी
शहरातील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली होती. त्यानंतर एनडीआरएफ जवानांकडून या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू झाले.
आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेतील मृतांची संख्या ३९ वर पोहचली. एका वृत्तसंस्थेने या संदर्भात वृत्त दिले. तसेच, ठाणे महापालिकेने या दुर्घटनेतील सर्व मृतांची ओळख देखील पटवल्याचे समजते.
इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून,अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो,असेही शिंदे यांनी सांगितले.
सुमारे ४५ वर्षे जुन्या या इमारतीत ४० कुटुंबं राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश होता. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावली होती.
COMMENTS