वेब टीम : दिल्ली देशव्यापी अनलॉकच्या चौथ्या टप्प्याची मुदत 30 सप्टेंबरला संपणार आहे. आता 1 ऑक्टोबरला अनलॉक-5 ची सुरुवात होणार आहे. केंद्र ...
वेब टीम : दिल्ली
देशव्यापी अनलॉकच्या चौथ्या टप्प्याची मुदत 30 सप्टेंबरला संपणार आहे.
आता 1 ऑक्टोबरला अनलॉक-5 ची सुरुवात होणार आहे.
केंद्र सरकार अनलॉक-5 अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सूट संदर्भात आज गाईडलाईन्स जारी करण्याची शक्यता आहे.
1 ऑक्टोबरपासून देशात काय सुरु होणार आणि काय बंद राहणार याबाबत अटकळ बांधली जात आहे.
लॉकडाऊनमध्ये पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे.
गेल्याच आठवड्यात ताज महलसह काही पर्यटन स्थळं सुरु करण्यात आली होती.
अनलॉक-5 अंतर्गत गृह मंत्रालय इतर पर्यटन स्थळही पर्यटकांसाठी खुली करण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे.
मात्र उत्तराखंड सरकारने पर्यटक, प्रवाशांसाठी क्वॉरन्टाईनशिवाय राज्यात येण्यास परवानगी दिली आहे.
25 मार्चपासून देशभरातील चित्रपटगृह बंद आहे.
1 ऑक्टोबरपासून केंद्र सरकार संपूर्ण देशातील चित्रपटगृह सतर्कतने सुरु करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात सर्व चित्रपटगृह, नृत्य-गायन आणि मॅजिक शो 1 ऑक्टोबरपासून सुरु करण्याची परवानगी आधीच दिली आहे.
परंतु यामध्ये 50 पेक्षा जास्त लोक सामील होऊ शकत नाहीत.
सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं आणि कोविड-19 च्या इतर अटींसह ही परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट सुरु होण्याची शक्यता आहे. मु
ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (28 सप्टेंबर) राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली.
त्यावेळी रेस्टॉरंट सुरु करण्याची कार्यपद्धती आधी ठरवली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं ठरलं आहे.
नेमके रेस्टॉरंट्स कसे सुरु करण्यात येतील? किती टक्के ग्राहकांना रेस्टॉरंट्समध्ये जाण्याची परवानगी असेल?
यासाठी नियमावलीही तयार करण्यात येणार आहे.
COMMENTS