वेब टीम : मुंबई श्रीमंत लोक कोरोनाची लक्षणे नसतानाही आयसीयू बेड्स अडवत आहेत, अशी धक्कादायक माहिती देतानाच हा प्रकार थांबवावा लागेल. ज्यांना...
वेब टीम : मुंबई
श्रीमंत लोक कोरोनाची लक्षणे नसतानाही आयसीयू बेड्स अडवत आहेत, अशी धक्कादायक माहिती देतानाच हा प्रकार थांबवावा लागेल.
ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांना बेड्स दिली पाहिजेत, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही धक्कादायक माहिती दिली.
यावेळी त्यांनी पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले.
रुग्णवाहिका न मिळाल्याने रायकर यांचा मृत्यू होणे हे दुर्देवी आहे.
पुण्यात बेड्सची आणि रुग्णवाहिकांची कमतरता असणे दुर्देवी असून
जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे ही त्यांनी सांगितले.
रुग्णवाहिका न मिळाळ्याने एखाद्या रुग्णाला त्रास होणे हे चुकीचे आहे.
या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये हा आमचा प्रयत्न असतो.जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना रुग्णवाहिका किती घ्याव्यात आणि किती घेऊ नये याबाबत कोणतंही बंधन घातलेलं नाही.
त्यांना कोणत्याही परिस्थितीत लागेल तेवढ्या रुग्णवाहिका घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रमाणापेक्षा जास्त रुग्णवाहिका घेतल्या तरी काही हरकत नाही.
मात्र रुग्णांना मोफत रुग्णवाहिका मिळाली पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS