वेब टीम : दिल्ली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी महत्वाची घोषणा केली. सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहक मागणी वाढावी यासाठी ...
वेब टीम : दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी महत्वाची घोषणा केली.
सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहक मागणी वाढावी यासाठी केंद्र सरकार खर्च उचलणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एलटीसी कॅश व्हाऊचर आणि विशेष फेस्टिव्हल ऍडव्हान्स स्किम लाँच करण्यात आली आहे.
कोरोना संकटामुळे ग्राहक मागणी वाढण्यासाठी संघर्ष करत असलेल्या अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
कोरोना संकटाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
पुरवठा सुरळीत होत असला तरी ग्राहक मागणी अजूनही कमी आहे.
पण सरकारने गरीब आणि कमकुवत वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये पाऊले उचलली आहेत, असे सीतारामन म्हणाल्या.
हळूहळू मागणी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही प्रस्ताव खर्च क्षमता वाढवण्यासाठी आहेत,
तर काही थेट जीडीपीमध्ये वाढ करण्यासाठी आहेत, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
अर्थव्यवस्थेत मागणी वाढवण्यासाठी जे दोन प्रस्ताव सादर केले जात आहेत, ते दोन वर्गांमध्ये आहेत.
एक ग्राहक खर्च आणि दुसरा भांडवली खर्च आहे,असे त्या म्हणाल्या.
केंद्र सरकारने ग्राहक खर्च वाढवण्याच्या दृष्टीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एलटीसी कॅश व्हाऊचर स्किम आणि विशेष फेस्टिव्हल ऍडव्हान्स स्किम आणली आहे.
LTC Cash Voucher Scheme अंतर्गत, कोणताही सरकारी कर्मचारी किमान १२ टक्के जीएसटी असलेल्या वस्तूंची खरेदी करत असेल
तर त्याला सुट्ट्यांच्या बदल्यात मिळणारी रक्कम आणि तीन वेळच्या तिकिटासाठी लागणारी रोकड मिळवण्याचा पर्याय असेल.
COMMENTS