वेब टीम : नांदेड अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे...
वेब टीम : नांदेड
अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले असून आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली.
त्याचेही पंचनामे सुरू आहेत, असा विश्वास देत वेळप्रसंगी कर्ज काढायला लागले तरी काढू पण
आम्ही शेतकऱ्यांना मदत करु, असा शब्द मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात प्रचंड नुकसान झालंय.
कृषी क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने वडेट्टीवार यांनी आज नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन आढावा घेतला.
यावेळी त्यांनी लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांना मदत करु असं आश्वासन दिलं.
शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले असून आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली त्याचेही पंचनामे सुरू आहेत.
हे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं.
हे वर्षे नैसर्गिक आपत्तीचे वर्षे असेल दुर्देवाने म्हणावे लागत आहे.
कोकणापासून ते विदर्भापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील काही भाग वगळला तर शेतकऱ्यांना खूप काही सहन करावे लागले आहे.
कोकणातील चक्रीवादळामुळे सर्वप्रथम तिथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
यासाठी राज्य शासनाने सातशे कोटी रुपयांची मदत उभी केली.
त्याखालोखाल आताचे हे नुकसान लक्षात घेता आम्ही केंद्र सरकारला मदत करण्याची विनंती केली आहे.
त्याबाबत त्यांना लेखीही कळविले आहे.
आम्ही आमच्या पातळीवर शेतकऱ्यांसाठी मदतीला तत्पर असून वेळप्रसंगी कर्ज काढायची वेळ जरी आली तरी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाचे सर्व मंत्री आज त्या-त्या जिल्ह्यातील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसमवेत मदतीसाठी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS