सरपंच प्रकाश गाजरे यांचे पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन सामाजिक बांधिलकी जपत संकटात करताहेत वेळोवेळी मदत आमदार निलेश लंके यांच्या प्रेरणेने...
सरपंच प्रकाश गाजरे यांचे पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन
सामाजिक बांधिलकी जपत संकटात करताहेत वेळोवेळी मदत
आमदार निलेश लंके यांच्या प्रेरणेने सरपंच गाजरे यांचे समाज उपयोगी काम
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश गाजरे हे नेहमी सामाजिक कामांमध्ये पुढे असतात. सध्या महाराष्ट्रावर पूर परिस्थितीचे जे संकट आले होते. त्या संकटामध्ये पुरग्रस्तांना मदत केली पाहिजे ही सामाजिक भावना मनात ठेवून त्यांनी आपल्या गावातील ग्रामस्थांना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या अहवानाला गावातून प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान प्रकाश गाजरे हे नियमित संकटाच्या काळात पुढे येत समाजहिताचे काम करत असतात. त्यांच्या या सामाजिक कामाला पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या सामाजिक कामाची प्रेरणा आहे. आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच प्रकाश गाजरे नेहमीच सामाजिक कामांमध्ये पुढे असतात.
आता महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या संकटात त्यांनी पूरग्रस्त भागाला मदत मिळाली पाहिजे ही सामाजिक भावना मनात ठेवून ते पुढे आले आहेत. त्यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत कोणती मदत या ठिकाणी पोहोचली पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी वस्तू स्वरूपात त्या भागातील नागरिकांना काय मदत करता येईल. हे ओळखून त्यांनी कपडे धान्य स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे ठरविले आहे.
सरपंच प्रकाश गाजरे यांनी घेतलेला हा निर्णय आणि संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना निस्वार्थपणे मदत करून ते एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत आहे. सरपंच प्रकाश गाजरे यांना म्हसोबा झाप ग्रामपंचायत मधील त्यांचे सहकारी तसेच मित्रपरिवार नेहमीच सामाजिक कामांमध्ये सहकार्य करत असतो. संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक गरजू घटकांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे कोरोना च्या काळातही त्यांनी वाटसरूंना मोफत जेवण देत खऱ्या अर्थाने आपली सामाजिक भावना जोपासली आहे. त्यांच्या या समाजाप्रती असलेल्या कार्याला समाजातूनही खूप मोठ्या प्रमाणात नेहमी पाठिंबा मिळतो. आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुरू असलेले हे कार्य निश्चितच समाजा साठी उपयोगाचे आहे.
दरम्यान अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी ताई कोठावळे यांनी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सांगली कोल्हापूर महाड चिपळूण या भागात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती तील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला सरपंच प्रकाश गाजरे प्रतिसाद देत एक चांगला निर्णय घेतला आहे.
COMMENTS