अहमदनगर (प्रतिनिधी) - मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी प्रतिज्ञा घेऊन वीर लहुजी वस्ताद यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देवून स्वातंत...
अहमदनगर (प्रतिनिधी) -
मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी प्रतिज्ञा घेऊन वीर लहुजी वस्ताद यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देवून स्वातंत्र्य क्रांतीची ज्योत पेटवली. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी अनेक क्रांतीकारक तयार केले व तरुणांना युद्धकलेचे शिक्षण देऊन स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. व अनेक स्वातंत्र्यसेनानी लहुजीं यांच्या आखाड्यात युद्धकलेचे शिक्षण घेतले. व त्यांचे कार्य इतिहासात अजरामर असेच आहे. त्यांचे कार्य पुढील पिढीला समाजाण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. त्यांची प्रेरणा घेऊन देशासाठी आपणही योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपाचे अनुसूचित जातीचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे म्हणाले
वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्यावतीने सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, अनुसूचित जातीचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, मनेष साठे, कुसूमताई शेलार, सुवेंद्र गांधी, अॅड.विवेक नाईक, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, सुमित बटुळे, अशोक भोसले, नितीन जोशी, प्रशांत मुथा, संतोष शिरसाठ, रोहन शेलार, नितीन चाबुकस्वार, टिम्स गायकवाड, भरत गायकवाड, गौतम कांबळे, अॅड.किरण भिंगारदिवे, अॅड.अभिजित अडागळे, संतोष पाटोळे आदि उपस्थित होते.
COMMENTS