घरकुल योजनेतील अनेक जाचक अटी रद्द करा पंचायत समिती सदस्या सुप्रिया अमोल साळवे यांची मागणी लाभांर्थ्यांचा रोष ग्रामसेवक, ग्रामपंचायत व पंचाय...
घरकुल योजनेतील अनेक जाचक अटी रद्द करा
पंचायत समिती सदस्या सुप्रिया अमोल साळवे यांची मागणी
लाभांर्थ्यांचा रोष ग्रामसेवक, ग्रामपंचायत व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांवर व अधिकाऱ्यांनावर.
पारनेर प्रतिनिधी :
केंद्र सरकारच्या जाचक निकषांमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना घरकुल योजनेसाठी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ड वर्ग यादीतील नागरिकांचा रोष स्थानिक ग्रामपंचायतीवर विनाकारण ओढवला जात आहे. पंचायत समितीचे ग्रामपंचायत व नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य मिळणार आहे. यामधील काही नियमांमुळे गरजवंत लाभार्थींना घरकुल मिळण्यापासून वंचित रहावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सदरच्या जाचक अटी व निकष शिथील करण्याची मागणी पारनेर पंचायत समितीच्या सदस्या सुप्रिया अमोल साळवे यांनी केली आहे.
प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत घरकुल मिळण्यासाठी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. ज्या घरात मोबाईल नाही. ज्या घरात पंखा नाही. अशा लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट केले जाते. मागील काही दिवसापासून कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. यामुळे घराघरात मोबाईल पोहोचला आहे. याशिवाय प्रत्येक घरात लहान मुले, वृद्ध व्यक्ती असतात, यामुळे प्रत्येक घरासाठी पंखा असणे गरजेचे आहे. तसेच फ्रिज, मोबाईल आणि दोन चाकी वाहने असणाऱ्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेपासून अलिप्त राहावे लागत आहे.
ज्या घरात शासकीय कर्मचारी आहे. ज्या घरात पाच एकर बागायती जमीन आहे. ज्या घरात चार चाकी वाहने आहेत. अशा लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात यावे. टीव्ही , पंखा, फ्रिज, मोबाईल यासारख्या छोट्या छोट्या वस्तूंच्या जाचक अटी या योजनेत लादू नयेत अशी मागणी सुप्रिया अमोल साळवी यांनी केली आहे.
लाभार्थ्यांना अडचणींचा सामना !
यामध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहन, किसान क्रेडिट कार्ड नसावे असे अनेक निकष असल्याने घरकुलास पात्र असलेल्या व्यक्तींपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या निकषामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक व पंचायत समिती अधिकाऱ्यांना लाभार्थीच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे काही निकष शिथील करणे गरजेचे आहे. असे मत पारनेर पंचायत समितीच्या सदस्या सुप्रिया अमोल साळवे यांनी मा.मुख्यमंत्री कार्यालय,महसुल मंञी,मा.पालक मंञी यांना निवेदनाद्वारे केले आहे.
गरवंत लाभार्थी वगळून सधन लाभार्थी निवडीमुळे ही अनेक गावांत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालाय.त्याचा समतोल साधन्याची ही मागणी सौ.साळवे यांनी केली आहे.
COMMENTS