नगर -आता युग बदलत चाललं आहे, केवळ पास होणे याला महत्व राहिले नाही, तर तुमच्यामधील कला-गुणांचे अवलोकन केले जाते. अर्ध्या मार्काने...
नगर -आता युग बदलत चाललं आहे, केवळ पास होणे याला महत्व राहिले नाही, तर तुमच्यामधील कला-गुणांचे अवलोकन केले जाते. अर्ध्या मार्काने स्पर्धा परिक्षेत मिळणारे यश हिरावून जाते. तेव्हा विद्यार्थ्यांनी आता कठोर परिश्रमाला आणि इच्छशक्तीच्या जोरावर कोणत्याही परिक्षेत यशस्वी होऊ शकतात, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी केले.
विळद घाट येथील डॉ.विखे पाटील फौंडेशनच्या कृषी महाविद्यालयात ‘कृषी उत्सव 2022’ वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी फौंडेशनचे विश्वस्त वसंतराव कापरे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी लेफ्टनंट (निवृत्त) डॉ.बी.सदानंदा, संचालक डॉ. पी.एम. गायकवाड, उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक, डॉ.एम.बी.धोंडे, उपप्राचार्य एच.एल. शिरसाठ आदि उपस्थित होते.
श्री.निचित पुढे म्हणाले, डॉ.विखे पाटील फौंडेशनच्या विविध कॉलेजमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. कृषी पदवीसाठी या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रात करिअर घडविण्याची चांगली संधी येथे उपलब्ध असल्याचे सांगून शिक्षणाबरोबरच खेळाला महत्व देत जा, त्यामुळे आरोग्य सुदृढ राहते, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात वसंतराव कापरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाविद्यालयात जास्तीत जास्त सर्व शैक्षणिक सेवा-सुविधा उपलब्ध केल्यामुळे डॉ.विखे पाटीलचे विद्यार्थी ज्या क्षेत्रात जातात तेथे महाविद्यालयाचा नाव लौकिक मिळवतात, असे सांगून प्राचार्य धोंडे यांनी माळरानावरील 15 एकर जमिन पिकासाठी तयार करुन उसासह विविध पिके घेतल्याबद्दल त्यांचे श्री.कापरे यांनी कौतुक केले.
प्रास्तविकात प्राचार्य डॉ.धोंडे यांनी मागील दोन वर्ष कोरोनामुळे सर्वांना त्रास झाला, त्याला तोंड देत पुन्हा नव्या उमेदिने सुरुवात केली. 2019-20 व 2021-22 असा दोन वर्षाचा अहवाल सादर करुन त्या काळातील विविध घडामोडी तसेच सुधारणांबाबत सविस्तर विवेचन त्यांनी केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सागर कर्डिले, आषिश धुमाळ, प्रांजल मेहेत्रे, वैष्णवी शिंदे यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस.बी.राऊत यांनी केले तर आभार डॉ.एच.एल.शिरसाठ यांनी मानले.
COMMENTS