शेतकऱ्यांनी पळसपूर वीज उपकेंद्राला घातला घेराव; मांडला ठिय्या ! महावितरण प्रशासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये : प्रकाश गाजरे पारनेर/प्रतिनिधी...
शेतकऱ्यांनी पळसपूर वीज उपकेंद्राला घातला घेराव; मांडला ठिय्या !
महावितरण प्रशासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये : प्रकाश गाजरे
पारनेर/प्रतिनिधी :
गेल्या एक वर्षापासून पळसपुर वीज उपकेंद्रा मधून होत असलेला विजेचा अनियमितपणा त्यामुळे शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात होत असलेले नुकसान विजेच्या या अनियमितपणा ला कंटाळून अखेर आज काटाळवेढा पळसपुर नांदूर पठार म्हसोबा झाप पोखरी या गावांतील शेतकऱ्यांनी आक्रमक होत पळसपुर वीज उपकेंद्रावर आज दुपारी चार वाजता ठिय्या मांडला.
दरम्यान सतत दुष्काळी पट्टा म्हणून ह्या गावांची ओळख आहे, चालू वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्या कारणाने शेतकऱ्यांनी कांदा ,वाटाणा ही नगदी पिके घेतली आहेत परंतु हा एक वर्षांपासून चालू असलेला खेळखंडोबा मागच्या एक आठवड्यापासून जास्त प्रमाणात वाढला आहे. गावच्या तलावातील विहिरीमधील पाणी साठे अवघे २० ते २५ दिवस टिकतील एवढेच शिल्लक राहिले आहेत आणि शेतकऱ्यांचे माल हे अंतिम टप्प्यात आलेले आहे. वाटाणा पीक असेल कांदा पीक असेल जर विजेचा हा प्रश्न २ दिवसात मिटला गेला नाही तर हा हातातोंडाशी आलेला घास गोरगरीब शेतकऱ्यांपासून हिरावला जाईल त्यामुळे आपण स्वतः यात लक्ष घालून आजच ह्या समस्येवर तोडगा काढवा अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी पळसपुर वीज उपकेंद्रावर ठिय्या मांडला.
या वेळी परिसरातील गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते याप्रसंगी विलास गाजरे, पांडूरंग आहेर, भाऊसाहेब हांडे, कैलास आगळे, कृष्णा गाजरे, छबू आरोटे, दिपक आरोटे, कैलास बेलकर, लहू बेलकर, पप्पू शिंदे, राहूल गाजरे, संपत शिंदे, दिलीप आहेर, निलेश गाजरे, संतोष बेलकर, किसन बेलकर, रमेश गाजरे, नामदेव ढोले, भास्कर ढोले, सुनिल आहेर, दयानंद शिंदे, रावसाहेब शिंदे, भाऊसाहेब ढोले, रामदास ढोले, लहु वाळुंज, बन्सी आरोटे, झांबर दरेकर, मारुती आरोटे, अशोक आहेर, आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील शेतकरी अतिशय वाईट परिस्थितीतून जात आहे. सतत निर्माण होणारी संवेदनशील परिस्थिती त्यामुळे शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला आला असून आता हातातोंडाशी आलेले पीकही जर विजेच्या लपंडावामुळे उध्वस्त झाले. तर शेतकऱ्याला आत्महत्या शिवाय पर्याय नाही. महावितरण प्रशासने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अन्यथा आक्रमक भूमिका घेत कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही.
प्रकाश गाजरे (सरपंच म्हसोबाझाप ग्रामपंचायत)
..
COMMENTS