वेब टीम : मुंबई सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काल पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अनेक विषयांवरून आरोप्रत्यारोप...
वेब टीम : मुंबई
सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काल पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अनेक विषयांवरून आरोप्रत्यारोप झाले. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विधानभवन परिसरात सत्ताधारी नेत्यांकडून घोषणाबाजी झाली.
दरम्यान, यावर आता पंकजा मुंडे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीकडून ओबीसी आरक्षणाला धक्का न्हवे तर धोका असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या, ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं निवडणूक आयोगाशी चर्चा करावी. ओबीसी ला आरक्षण मिळाव असं सरकाराला वाटत नाही का? आम्ही सरकारला पाठिंबा तयार देण्यास तयार आहोत.
राज्य सरकारनं अंतरिम अहवाल गांभिर्यानं तयार केलेला नाही. छगन भुजबळ म्हणाले, आरक्षणासाठी एकत्र यावं. त्याप्रमाण आम्ही याला पाठिंबा देतो. महाविकास आघाडी सरकारनं याच पद्धतीनं मराठा आरक्षणालाही धोका दिला आहे.
आमची सत्ता असताना त्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र त्यांच आरक्षणही त्यांनी घाववलं आहे, असंही त्यांनी सुवावलं आहे.
COMMENTS