तालुक्याच्या पाणीप्रश्नाला फुटणार वाचा; भुमिपुत्र शेतकरी संघटना मैदानात पारनेर येथे शेतकऱ्यांच्या उपस्थित पाणीप्रश्नां संदर्भात बैठक पारनेर ...
तालुक्याच्या पाणीप्रश्नाला फुटणार वाचा; भुमिपुत्र शेतकरी संघटना मैदानात
पारनेर येथे शेतकऱ्यांच्या उपस्थित पाणीप्रश्नां संदर्भात बैठक
पारनेर प्रतिनिधी :
जिल्ह्यातील पारनेर-नगर श्रीगोंदा या तालुक्यांतील बराचसा भाग दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. सह्याद्री घाटमाथ्यावरील पाणी अडवून या पाण्याचा लाभ दुष्काळी भागाला होऊ शकतो त्यासाठी पन्नास वर्षापासून प्रलंबित असलेल्या जलसिंचन योजना साकळाई जलसिंचन योजना तसेच शहाजापूर राळेगण-सिद्धी पुणेवाडी कान्हूर पठार उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित होणे गरजेचे आहे. ही योजना कार्यान्वित झाली तर अहमदनगर जिल्ह्यातील पठार भागावरील २०० पेक्षा जास्त गावांना या योजनेचा फायदा होणार आहे.
यासंदर्भात सविस्तर पाठपुरावा राज्य सरकारकडे करत असलेले सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासमवेत पारनेर या ठिकाणी अभ्यासपूर्ण बैठक झाली. दुष्काळी पट्ट्यातील उपसा जलसिंचन योजनेसंदर्भात माहिती कार्यशाळा पारनेर पंचायत समिती सभागृह मध्ये संपन्न झाली यावेळी जगन्नाथ भोर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जलसिंचन योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या व भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत पठार भागावर पंचायत समिती गणनिहाय पाणी प्रश्नासंदर्भात जनजागृती कार्यक्रम व बैठका घेऊन तालुक्याच्या पठार भागावरील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मोठा लढा उभारण्यात येणार आहे.
यावेळी झालेल्या बैठकीला भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, प्रदेश सचिव किरण वाबळे, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष राम वाडेकर, जिल्हा संघटक संतोष वाबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम देठे, जिल्हा सचिव संतोष कोरडे, कारभारी आहेर, तुषार आहेर, युवक जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब झांबरे, अविनाश देशमुख, तालुका अध्यक्ष विशाल करंजुले, तालुका प्रवक्ते राजू रोकडे, संजय भोर, महेश झावरे, नानाभाऊ काशीद, विलास गागरे, चेअरमन संजय भोर, विठ्ठल देठे, नंदू साळवे अन्सार पटेल, बाळासाहेब वाळुंज, विलास वाघमारे, वसंत साठे, सावळेराम साठे, खंडू गुंजाळ, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सचिन काकडे, रामदास गगे ,बाळासाहेब सातव ,ताराचंद करंजुले, संतोष देशमुख, बबन शिंदे, पाराजी जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.
तालुक्याची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी पठार भागावरील प्रलंबित पाणीप्रश्न संदर्भात लढा उभारण्यासाठी व पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तालुक्यातील सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक असून पाण्यासंदर्भात मोठा लढा उभा करण्यासाठी जनतेचाही या आंदोलनात मोठा सहभाग असणे आवश्यक आहे.
संतोष वाडेकर (अध्यक्ष : भुमिपुत्र शेतकरी संघटना)