आणे येथे विज पडून बारा शेळ्याचा मृत्यु; शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या : डॉ. दीपक आहेर अणे प्र...
आणे येथे विज पडून बारा शेळ्याचा मृत्यु; शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान
पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या : डॉ. दीपक आहेर
अणे प्रतिनिधी :
गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथील ठाकर वस्तीवरील धोंडिबा कोतवाल यांच्या बुधवार (दि.१) रोजी आलेल्या पावसाने वीज पडून १२ शेळ्यांनाचा मृत्यू झाला आहे.
धोंडिबा कोतवाल व त्यांची पत्नी कमल कोतवाल हे सकाळी दहा वाजता शेळ्या चारण्यासाठी आणे शिवारात गेले होते.
धोंडिबा कोतवाल शेळ्या चारत असताना दुपारी तीन नंतर अचानक मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात झाली, पाऊस याला लागला म्हणून शेळ्यांनी निवऱ्यासाठी एका करवंदीच्या झाडाचा आसरा घेतला आणि नेमका त्याच झाडावर विज पडली आणि त्यात धोंडिबा कोतवाल यांच्या आठ आणि शिवाजी कोतवाल यांच्या चार अशा एकूण बारा शेळ्या मृत्युमुखी पडल्या.
शेळ्यांच्या शेजारीच झाडाखाली बसलेल्या कमल कोतवाल यांना पण विजेच्या झटक्याचा मुका मार लागल्याचे कमल कोतवाल यांनी सांगितले.
कोतवाल यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे आणि त्यांच्यावरच असे नैसर्गिक संकट ओढवल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. प्रशासणाने तात्काळ नुकसानग्रस्त गरीब कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आणि अणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मातोश्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर यांनी केली आहे.
अणे पठार भागावर मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले. असून आणि पठार भागावर शेतकरी वर्ग मोठा असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय स्तरावरून नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित मदत जमा करण्यात यावी.
डॉ. दीपक आहेर
संचालक विविध कार्यकारी सेवा सोसायटी अणे
कार्याध्यक्ष : मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान
COMMENTS