नारायणगव्हाण चौपदरीकरणासाठी होणार नव्याने भूसंपादन ! सुधारीत प्रस्तावासाठी बांधकाम विभागाकडून पाठपुरवा सुरू .. त्या निवेदनाची वरिष्ठ पातळीवर...
नारायणगव्हाण चौपदरीकरणासाठी होणार नव्याने भूसंपादन !
सुधारीत प्रस्तावासाठी बांधकाम विभागाकडून पाठपुरवा सुरू
.. त्या निवेदनाची वरिष्ठ पातळीवरून घेतली दखल
सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांची माहिती
पारनेर प्रतिनिधी :
नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण चौपदरीकरणाचे काम काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहील्यामुळे गावातील शाळकरी विदयार्थी, अबाल वृद्ध, गावकऱ्यां बरोबरच प्रवाशांनाही मोठा धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्त्यासाठी ग्रामस्थ सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. निवेदन, उपोषण, रास्ता रोको, टोलबंद आंदोलन अशा विविध मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम आंदोलनकर्ते, ग्रामस्थांकडून करण्यात आले.
प्रशासनाने मागील आंदोलनाच्या वेळी अर्धवट रस्त्याचे काम गावांपर्यंत करत सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले. परंतु उर्वरित रस्ताचा प्रश्न प्रलंबितच राहीला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी पुन्हा नव्याने प्रशासणाकडे नागरिकांच्या सुरक्षिततेसह अपुर्ण रस्त्यामुळे गावाची थांबलेली प्रगती यासाठी पाठपुरावा सुरु केला असून याची दखल घेत प्रशासनाने तातडीने रस्त्यावरच्या सुरक्षिततेच्या कामांसोबतच नारायणगव्हाण चौपदरीकरणाच्या भुसंपादनाचा नव्याने सुधारीत प्रस्ताव बनवण्यासाठी रस्त्यालगतच्या मिळकतींचे उतारे जमा करण्याचे पत्र ग्रामसेवक तलाठी यांना देण्यात आले असून याकामी रस्त्याबरोबरच पुढील भुसंपादनाचा योग्य मोबदला जागा मालकांना मिळवण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करत राहणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
नारायणगव्हाण चौपदरीकरणासह, महामार्गांवरील सतत घडणारे अपघात रोखण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करतच राहणार त्याचबरोबर अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या देवदुतांचा शासकीय पातळीवर सन्मान करण्यासाठी पुढाकार घेणार
शरद पवळे (सामाजिक कार्यकर्त)
..