कर्मवीर भाऊराव पाटीलांचा शैक्षणिक वारसा कापसे सरांनी जतन केला : विजय औटी पारनेर/प्रतिनिधी : जय मल्हार हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.एस....
कर्मवीर भाऊराव पाटीलांचा शैक्षणिक वारसा कापसे सरांनी जतन केला : विजय औटी
पारनेर/प्रतिनिधी :
जय मल्हार हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.एस. कापसे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभ प्रसंगी माजी आमदार विजय औटी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर होते. प्रमुख उपस्थिती मध्ये माजी आमदार पोपटराव गावडे, पीएमआरडीए चे उपायुक्त रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, आंबेगाव गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, माजी सभापती मधुकर उचाळे,शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, डॉ. भास्करराव शिरोळे, वल्लभ शेठ शेळके, उप तालुका प्रमुख डॉ. कोमल भंडारी, माजी मुख्याध्यापक शिवाजीराव धायगुडे, पांडुरंग आंधळे, मुख्याध्यापक सतीश फिरोदिया उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना औटी म्हणाले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या डीसीएम संस्थेतील महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराचा आदर्श घेऊन कापसे सरांनी केलेल्या कामाचा अभिमान वाटतो. या महान विभुतींचा शैक्षणिक वारसा जतन करण्याचे काम कापसे सरांनी केले. कापसे सरांचे वडील शिक्षक होते त्यांचे संस्कार त्यांच्यावर झाल्याकारणाने शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. समाजकारणात कापसे सरांचे योगदान फार मोठे आहे. आळकुटी परिसरात कापसे सरांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांना काशिनाथ दाते सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असल्याचेही माजी आमदार विजय औटी यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले आजपर्यंत विद्यालयातील कापसे सरांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर काम करीत असून त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, गट विकास अधिकारी जालिंदर पठारे, बाबासाहेब फिरोदिया यांनीही गौरव पर मनोगत व्यक्त केले.
यावेळी कापसे सरांच्या सन्मानार्थ माजी विद्यार्थी व समस्त ग्रामस्थ जांबुत यांनी लोकवर्गणीतून चार चाकी स्विफ्ट डिझायर गाडी भेट दिली
गणित विषयाबरोबर स्पर्धा परीक्षा व बाह्य परीक्षांचे आयोजन करून चौरंगी पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचे काम मुख्याध्यापक आर. एस. कापसे सरांनी केले त्यांचे कार्य निश्चितपणे उल्लेखनीय आहे :
सभापती काशिनाथ दाते सर, (बांधकाम व कृषी समिती जिल्हा परिषद अहमदनगर)
यावेळी माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पठारे, बाळासाहेब फिरोदीया,बाळासाहेब बंदर, डॉ. खंडू फलके डॉ. शाकुराव कोरडे, मारुती कदम, विठ्ठल शितोळे, प्राचार्य रामदास मगर, सुखदेव गाजरे, दत्ता जोरी, नाथा शेठ जोरी, पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, बाळकृष्ण गुंजाळ, सरपंच सुरेश तिकोणे, सतीश गोडसे, दत्तात्रय मस्के, शांताराम गुंजाळ, मच्छिंद्र गुंजाळ, मुख्याध्यापक सुदाम जगताप, आर.बी गावडे, आर एस कापसे सरांच्या मातोश्री शांताबाई कापसे, सिद्धी कापसे, कापसे सरांचे सर्व सहकारी शिक्षक, पाबळचे ग्रामस्थ, रानमाळ्याचे ग्रामस्थ व जांबुतचे ग्रामस्थ इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव जोरी सरांनी केले मुख्याध्यापक सतीश फिरोदिया यांनी प्रास्ताविक केले तर बाळासाहेब फिरोदिया यांनी आभार मानले.