महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करा : ज्ञानदेव पांडुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने सन्मान पारनेर/...
महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करा : ज्ञानदेव पांडुळे
गुणवंत विद्यार्थ्यांचा भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने सन्मान
पारनेर/प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिकला पाहिजे यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना भाऊराव पाटलांनी केली. विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सेक्रेटरी ज्ञानदेव पांडुळे यांनी व्यक्त केले.
वडगाव सावताळ चे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांच्या मित्र मंडळाच्या वतीने तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या धोत्रे व टाकळी ढोकेश्वर येथील विद्यालयातील गुणवंत दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान समारंभ नुकताच संपन्न झाला तसेच यावेळी कोल्हापूर संस्थानचे राजे राजश्री शाहू महाराज यांची जयंती ही साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्था बॉडी जनरल सेक्रेटरी ज्ञानदेव पांडुळे ज्येष्ठ नेते वडगाव सावताळचे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे अहमदनगर सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक मोहनराव रोकडे हे यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाऊसाहेब शिंदे म्हणाले की ग्रामीण भागामध्ये अनेक हुशार विद्यार्थी आहे परंतु त्यांना पाहिजे तशा पद्धतीचे व्यासपीठ उपलब्ध होत नाही. हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत व त्यांना आवश्यक त्यावेळेस मदत करण्याचा आम्ही मानस करत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये महापुरुषांना आदर्श मानले पाहिजे तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी हा घडतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे ही वळणे गरजेचे आहे.
या कार्यक्रम प्रसंगी मा. मुख्याध्यापक शिवाजी खामकर सर, गो. या. रोकडे गुरुजी, नामदेव रोकडे, नारायण शिंदे, ठकाजी रांधवन, सुखदेव भनगडे, बबन शिंदे, भाऊसाहेब शिंदे, योगेश रोकडे, निवृत्ती शिंदे, अशोक रोकडे, अनिल गायकवाड, भाऊ शिंदे, विशाल साळवे, ज्ञानदेव खामकर, तुकाराम खामकर, संदीप झावरे, भाऊसाहेब महाराज रोकडे, मंगेश रोकडे, संदीप खंडागळे, आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.