सुपे एमआयडीसीत दुर्गंधी; रस्त्याच्या कडेला तुंबलेली गटारे कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेची जबाबदारी कोणाची ? पारनेर/प्रतिनिधी : सुपे एमआयडीसी...
सुपे एमआयडीसीत दुर्गंधी; रस्त्याच्या कडेला तुंबलेली गटारे
कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेची जबाबदारी कोणाची ?
पारनेर/प्रतिनिधी :
सुपे एमआयडीसी मध्ये सांडपाणी व कचराव्यवस्थापन नसल्याने सांडपाण्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग पहावयास मिळत आहेत. तसेच गटारही व्यवस्थीत नसल्याने अनेक ठिकाणी गटारी साठल्या आहेत. त्यामुळे एमआयडीसी परीसरात दुर्गंधी पसरली आहे. तर काही भागात गटारीची व्यवस्थाच नाही. वसाहतीत सांडपाण्यावर प्रक्रीया करणारा प्रकल्प उभारणे व कचरा व्यवस्थापणाची गरज आहे. मात्र या बाबीकडे एमआयडीसीचे अधिकारी पुर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.
सुपे येथे १९९८ साली पहिली एमआयडीसी स्थापन झाली. सुमारे ३२९ हेक्टर क्षेत्रावर या एमआयडीसीची उभारणी झाली येथे छोटे व मध्यामस्वरूपाचे सुमारे दोनशे पन्नास तर मोठे सहा ते सात उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. या वसाहतीचा म्हणावा तसा विकास झाला नाही. येथे सुरू असलेल्या उद्योगात जल शुद्धीकरण प्रकल्प व दुध शितीकरण प्रकल्प यांचीच संख्या अधिक आहे. इतरही छोटे मोठे उद्योग व्यावसाय आहेत. मात्र या वसाहतीत बंदीस्त गटार व्यवस्था अद्यापही झाली नाही. अनेक ठिकाणी कारखाणदारांनी आपले कारखाण्यातील दुषीत पाणी गटारात थेट सोडून दिले आहे. तर काहींनी कारखाणा परीसरात आपल्याच हद्दीत कुपनलिका खोदून किंवा कारखाणा परीसरातच खोल खड्डा घेऊन त्यात पाणी टाकून ते जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा परिणाम आसपासच्या शेतकऱ्यांच्या विहीरीचे पाणी दुषीत झाले आहे.
प्रत्येक कारखान्याने आपल्या कारखाण्यातून बाहेर पडणारे सांडपाणी किंवा दुषीत व रासयनयुक्त पाणी शुद्ध करण्याची प्रक्रीया राबविणे गरजेचे आहे. तसेच कारखाण्यांनी गटारीत सोडलेल्या पाण्याचे एकत्रिकरण करूण त्यावर प्रक्रीया करूऩ त्या पाण्याचा पुर्णवापर कसा करता येईल यासाठी एमआयडीसीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तशी ती एमआयडीसीची ती जबाबदारी सुद्धा आहे. मात्र तसे न केल्याने सुपे एमआयडीसीत जागोजाग कचऱ्याचे ढीग दिसून येतात. तसेच अनेक ठिकाणी तुंबलेल्या गटारी आढळून येतात या तुंबलेल्या गटारीची दुर्गंधी सर्वत्र पसरते मात्र या कडे एमआयडीसीचे अधिकारी पुर्णपणे डोळेझाक करत आहेत.
एमआयडीसीतील कचरा तसेच सांडपाणीव्यवस्था या मुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास सांभळण्याची जबाबदारी प्रदुषण महामंडळाची आहे. एमआयडीसी मधील पर्यावराणाचा समतोल राखणे वातावरण तसेच पर्यावरण दुषीत होणार नाही याची प्रदुषण महामंडळाने काळजी घेतली पाहीजे.
नितीन गवळी, विभागिय अधिकारी नाशिक (एमआयडीसी)
एमआयडीसीचे अनेक कारखानदार त्यांचे दुषीत पाणी जमिनीत मुरवतात त्यामुळे परीसरातील विहीरीचे पाणी दुषीत झाले आहे. ते पाणी पिण्यासही योग्य राहिले नाही. इतकेच नव्हे तर त्या खराब पाण्याचा वापर काही पिकांना सुद्धा करता येत नाही त्याचा पिकावर दुष्परिणाम होत आहे. याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
COMMENTS