वेब टीम : मुंबई कोअर कमिटीच्या प्रदीर्घ बैठकीनंतर भाजपच्या कोअर कमिटीतील नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्य...
वेब टीम : मुंबई
कोअर कमिटीच्या प्रदीर्घ बैठकीनंतर भाजपच्या कोअर कमिटीतील नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली.
त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढलो. जनादेश महायुती म्हणून मिळाला. पण सेना सोबत इच्छित येऊ नाही.
त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करु शकत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार असेल तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
COMMENTS