वेब टीम : अहमदनगर जिल्ह्यातील आतापर्यंत ३४६ व्यक्तींची तपासणी केली असून २५ व्यक्तींना आरोग्य यंत्रणेच्या देखरेखी खाली ठेवले आहे. एनआय...
वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यातील आतापर्यंत ३४६ व्यक्तींची तपासणी केली असून २५ व्यक्तींना आरोग्य यंत्रणेच्या देखरेखी खाली ठेवले आहे.
एनआयव्हीकडे २३६ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते त्यातील दोनशे अकरा जणांचे स्त्राव नमुने निगेटिव आल्याने त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवले आहे.
बाधित तीनही रुग्णांची तब्येत स्थिर आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
दिवेदी यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आणि आरोग्य विभागाच्या डॉक्टरांशी चर्चा करून आढावा घेत तसेच यापुढील काळात अधिकाधिक सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन व आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
त्यामुळे बाह्यरुग्ण तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींमध्येही या आजाराची लक्षणे बाह्य स्वरूपात दिसून येत असतील तर त्याचीही तपासणी करून त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे.
अशा ७९ जणांना आजअखेर देखरेखीखाली ठेवले आहे.
शहरात आढळलेल्या कोरोना बाधित पहिल्या रुग्णास उद्या चौदा दिवस पूर्ण होत आहेत.
त्याचा स्त्राव नमुना एनआयव्हीकडे पाठविणार आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलीस दल प्रयत्न करीत आहे.
त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रत्येक नागरिकाने या विषाणू संसर्गाचा धोका ओळखावा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच स्वतः:च्या व समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
COMMENTS